कैक तास, मी झटुन काढले
ते ठिपके त्या ओळी
रंग संगती, किनार भोवती,
पुरी
झाली रांगोळी
अल्लड वारा पाहत होता वाट होऊन अधीर
सुसाट वेडा धावत सुटला, जसा धनुतुन तीर
मी हि चिडले, बरीच रडले,
हळुच
म्हणाले पान
फेर धरूनी आम्ही नाचलो, ही रांगोळी छान
पान फुलांनी सडा घातला, किती ठिपके अन
ओळी
वरून केली आभाळाने रिती रंगांची झोळी
पंख चिमुकले बसत फुलावर हसत म्हणाले तेव्हा
तुझ्या स्फूर्तीने हि रांगोळी, हा
निसर्गहि करतो हेवा
..भावना